सोमवार, ६ एप्रिल, २०१५

लांडगा आणि कोकरू

  इसापने रचलेल्या नीतीकथांमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. त्या गोष्टी त्याने जरी प्राण्यांवर रचल्या तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली. जगात कसे वागावे हे शिकवले.

लांडगा आणि कोकरू

एका मेंढयांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते, ते एका लांडग्याने पाहिले वत्याने त्याचा पाठलाग केला. याच्या हातून आपण आता सुटत नाही असे पाहून लांडगा जवळ येताच, कोकरू हसत त्यास म्हणाले, ‘अरे, तू मला मारून खाणार, हे मी जाणूनच आहे. पण होता होईल तो आनंदाने मरावे, अशी माझी इच्छा असल्यामुळे, तू आपली मुरली थोडा वेळ मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.’ ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला. त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकून, जवळच असलेले कुत्रे धावत आले. त्यांस पाहताच लांडगा भयाने पलू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला, ‘आपला धंदा सोडून भलत्याच धंदयात पडल्यामुळे असा परिणाम झाला.’ ‘माझा धंदा खाटकाचा, तो सोडून मी वाजंत्र्याचे काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !’ 
तात्पर्य:- नादी मनुष्याला त्याच्या नादी लावून, चतुर लोक सहज फसवू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा